Monday, December 31, 2012

2012

another year end ...





khup kahi ghadal ......khup kahi milala ....gamavlahi ....
sagali golaberij karata ....nakalatach algad pangali madhe pan galun padav 
tasach ajun ek varsh gel ...

navin nati jodiLi ... juni tikavyacha praytnahi ....anek confession zale ...navyane lok kalale ....ayushyat asnarya lokanchi kimmat kalali ..mitrana dur jatana baghital ...chidchid kwli ...swatahchi samjut swatahach kadhali .....

navin country explore keli ...vaya janyacha anubhav gjetala ...lokanvar vishwas nahi thevaycha he pan  shikale ...

Cultural diff ...struggle for existance ...the ecconomic diffeeence ....don veglya jaganamdhe swatah banun jagan ....khup kathin ahe ...nibhaval tarihi....

mala me nanavyane mich mala umagale ....punyat baslya baslya jya goshtinchi kalaji karauche tya kiti kshullak hotya ithe yeun janaval

sagalya navin goshti try kelya ...kahi jamlaya ..kahin mule confidence gela ....pan abhi toh shuruvat hai ...

jagaychi ghai nahi ..sagal attach pahije asa attahas pan nahi ...zalelya chuka yach varshat sodaychya ani udyapasun navin.chuka karaychya ...
perfect banaych pan swathsathi ....

barobar chuk apanach tharvaych ..ghetlelya decisiknshi ferm rahaych...
lokani kasahi vagu de ....bhad me gai duniya ..me mza swabhav nahi sodnar ...
lokana madat karan hech kartavya...hech tar shikavl aai babani ...swatachya chukanch khapar swatach pelaych ani manas jodayche ...kamipana la tari chalele pan kunala dukhvaych nahi ...

navin dhey ...with renewed confidence ....n a smile ....
jine ke liye aur kya chahiye .....



Description: Description: cid:image014.gif@01CC9FA8.B28D7980




pournima

Tuesday, December 18, 2012

The End.... Of a semester :-P

"आईला"(just an Expression, not mother) हे कधी झाल ?
Us ला आले , घर घेतलं , फिरले ..Lecture केले ...सगळ मजा मजा सुरु होत ...
आणि कळलच  नाही ...५ महिने होत आले ..आणि first exam पण झाली ...
(** Whats app  ची एक smiley आठवतेय ...)

पहिल्यांदा अस होतंय कि exam संपताना घरी जायची ओढ  नाही.. वाटतय पण जाता नाही येणार..
काही plans नाही ..जुने friends  भेटणार नाही... नवीन पैकी कुणीच इथे नाही..
तिकडे सगळ्यांची लग्न होत आहेत.. get together  पण ..

सगळा emotional chaos आहे. 
i knew this is gonna happen. तरी म्हणतात न  "कूछ  पाने के लिये कूछ  खोना भी पडता है ।"
त्यामुळे दोन वर्षानंतर जे समाधान मिळणार न त्यासाठी या छोट्या गोष्टींवर पाणी सोडायचं ..

सोडलाही...लग्नाला जायची इच्छा त्यांच्या photos वर भागवली ...भेटायची इच्छा calls वर ..
इथे plans केले आहेत त्या friends सोबत ..

माहिती आयुष्यात रडून काहीच मिळत नाही..गोष्टी घडवून आणाव्या लागतात ..
घरात बसून "मी तिथे का नाही", "मी हे miss करतेय " हे म्हणत बसण्यापेक्षा मी स्वताच काही भन्नाट करेन ...

आहे तो क्षण जगायचा ...आणि मजेतच घालवायचा...रडायला खरच वेळ कुणाकडे आहे....



Description: Description: cid:image014.gif@01CC9FA8.B28D7980
pournima

Friday, November 23, 2012

The finger experience....

Chilly night in San Jose ..
When everyone else was busy with finding cheapest things to buy inside the mall..
he held my hand quietly. I don't know was it because of him or the chilly breeze but i started shivering.
I could feel my heartbeat in my finger he was holding.
He offered me a sweater to wear without leaving my hand.
Looked me in the eye n said .."How did this happen?"
I was too deeply involved looking him to notice his question.
He asked again ..
n i whispered "I sat on my hand " ...
he started laughing , n called his fellows to get me medical help ..
I regained my senses ..
he was laughing at my foolishness ,and i knew soon my friends would do that too.

I was embarrassed ,i was standing  but at the same time the pain was unbearable.
in one night , i had fun  waiting up in the line for Black Friday sale , i had a moment of joy when got unexpected discount on my clothes, a moment when i was hell tired and wanted to sit somewhere,
a moment of surging pain , a moment with a handsome police and firemen taking care of me...

and rest of the night where my friends were teasing me about how i sat on my own finger..
and the receipt of a policemen showing i was drug addict and has a severe head injury...
i was annoyed but then realized ,i have such good friends ,taking so much efforts to divert me from the pain..

what a night it was !!!!

p.s : there was a wooden plank which i tried to sit on and accidentally put my hand in between the floor and the plank



Description: Description: cid:image014.gif@01CC9FA8.B28D7980
pournima


Monday, November 12, 2012

Hope..

Just when you start feeling you are alone in the world, fight with the tears that come along ,console yourself that there is a way out of this darkness..
someone unknowingly lightened up the lantern u needed.
A small kindle of hope that you still can survive..
You feel so grateful ,wish you could let the person know what he did for you.
But you can not , being afraid of letting the person know the darkened side of yours..
So this was the best way i could find..




I was feeling blue ..badly missing the Diwali days being with my family..
Instead i delighted in card games and relishing the brownie-ice-cream combo ,fighting over it ;-)
If you are reading this .. Thank you so much..
They are the stupidest but adorable people in my life ..
thanks for reminding me that i am not alone and never will be ... :-)


Description: Description: cid:image014.gif@01CC9FA8.B28D7980
pournima
































Friday, November 2, 2012

memories..

कुठे हरवलाय तो ओलावा ..

ती ओढ ..ती काळजी ..आपलेपणा , 
एकमेकांसोबत कितीही भांडलो तरी बाहेरच्या जगाला एक म्हणून सामोर जायचं 
मस्ती आणि दंगा याहीपलीकडे जाऊन होणार हितगुज .
डोक्यावरच्या ओझ्याचं पोत रिकाम कराव आणि हलक्या मनाने  पिसागत उडाव ..
२४ सोबतही जेंव्हा कमी वाटायची ..सकाळ एकमेकांना  आणि रात्रही एकमेकांची उडवत व्हयाची.
बाहेर च्या जगात सिंहाची  मांजर व्हावी ..
टपल्या काय लाथा काय ...गुदगल्या काय किंवा गालगुच्चे काय सगळाच बालिश ..
चिडण चिडवण हा तर रोजचाच उद्योग .. 
कुणी हिरमुसल कि एक smile ..कुणी रडल कि एक hug ..किती समाधान वाटायचं.
छोट्या छोट्या गोष्टींच celebration ..
किती गुरफटलो न एकमेकांत कि बाहेरच जग क्षुल्लक वाटाव ..
पण सगळाच बदलल..
भेट नाही साध बोलणही  नाही ,, त्या विश्वात दुसर्यांना जागाच नाही ..
एकमेकांच्या इतक्या spacial moments साठी कुणाला वेळ नाही , कदाचित तो काढायची इच्छा पण..
"तुम्ही अस करणार?"

आता पुन्हा तशी मैत्री नाही मिळणार मला..
मनात येईल ते बोलेन पण वाईट न वाटून घेणारे लोकच नाही..
मनसोक्त रडायला इथे कुणाचा  खांदाच  मिळत नाही..
मनापासून कौतुक करणार , नाही आवडलं तर तोंडावर सांगणाराही कुणी नाही..
सगळाच वरवरच ...हताश होते मी कधी कधी ..
पण लक्षात येत त्यांच्याही आयुष्यात कुणी तुम्च्यासारख  असणारच न ..
ते लोकही तो ओलावा टिकवायचा प्रयत्न करत असणार ...

पुण्यात येण्याच्या निर्णयाने मला जे  दिलय मला ते आयुष्यभर तसाच ठेवायचं....
मला थोडीशी मदत कराल?



Description: Description: cid:image014.gif@01CC9FA8.B28D7980
pournima

Friday, October 26, 2012

Those little things ..

I am fed up of being emotional...
Caring for every little thing people expect from me..
being jealous, trying to fit in, controlling the rage and irritation , missing out things, regretting to leave everything in India coming to US,
knowing that everyone else is sad of me being far away ,having fun is a crime..
What exactly is my fault?
i was happy with my life ..no big dreams no exceeding expectations..with a bunch of friends who really cared . I never had to try to be with someone so bad.
Being away from home for 6 years was definitely my decision ..but now i want to be at home.
I don't see its happening till next 3-4 years.
Moreover , i have to be perfect human being.. no affair.. no drinks .. not close friendship with guys.
I have to be a perfect student n get good grades.
So that i can be the perfect marriage material ..
n people say it is easy being a girl ,...you have no idea !!

Its just the family matters..
what about the things you manage after crossing 7 seas,,,
first the time difference ..there is no good time to talk.
Second money matters.. its almost killing me that i don't have money to pay the rent
everything is so expensive. Being jealous that your roommates can afford the stuff you can not even dream of.. third tough competition for exams and jobs.. relative grading.. for once in my life i am trying to do better and i failed in every aspect.and so on..

I know i want to have fun because these days would never come back.
But being emotional is not getting me through this situation...
May be some logic will help me ;-) ...


Description: Description: cid:image014.gif@01CC9FA8.B28D7980
pournima















Thursday, September 20, 2012

मित्र जेंव्हा दूर जातात ...



खर तर मैत्रिणी म्हणायला पाहिजे..
लहानपणी "बिनधास्त " muv  बघितल्यानंतर मनापासून ठरवलेलं मैत्रीणीना जपून जवळ ठेवेन वगैरे..
बालिश वाटत आता सगळ..
छोट्या गोष्टींवरून  वाद , मतभेद ,दूरवर job postings  हे आता खूप क्षुल्लक वाटायला लागलाय..
खर अंतर आला ते त्याच लग्न ठरल्यावर ..
(माझ लग्न ठरल्यावर मी हेच करेन बहुधा ..असो..)
या गोष्टची पहिली जाणीव झाली ती मी माझी सर्वांत जवळची आणि जुनी मैत्रीण गमावली ..
ती म्हणजे माझी ताई.......
सगळाच बदलत... तिचा वेळ वाटला गेल्या .. गप्पा बदलल्या ..
तिला  share  करयाला हक्काचा व्यक्ती मिळाला ..
नवीन नाती अचानकच निर्माण झाली..
हे होणार कधी न कधी माहिती होताच पण मन तयारच नव्हत  accept  करयला..
खूप भांडले स्वताशीच .. तिला कधी बोलले नाही... 
भीत पण वाटली कि जेवढी काळजी मी तिची करते . जीजू करतील  का..
लाग्नाधी त्यांनी पाठवलेल्या एका  sms  वर माझी काळजी संपली.
 i let her go.. 
राग पण कमी झाला .. आहे त्यावेळात खूप काही तिच्याशी बोलून घ्यायचं आणि तिला तितकच जवळ ठेवायचा ठरवलं..
वेळ सरत गेली..
माझ्या दिशा वेगळ्या होत गेल्या .. म्हणून कधी लग्नाची भानगड झाली नाही..
पण म्हणून माझ्या मैत्रिणी त्यापासून वाचल्या नाहीत ( :-P kidding) ...
महिन्यातून एकदाच बोलणारी पण मनापासून  सगळ  share  करणारी अशी ती "Rasi" 
तीच लग्न हा आमच्यासोबत तिच्यासाठी पण shock  होता..
नव्यानेच मैत्रीण झालेली आणि  unexpectedly  खूप  मैत्रीण झाली ती म्हणजे माधवी .
जिच लग्न ठरतंय या कल्पनेनेच सगळ्यांना धक्का बसावा त समीक्षा ..
एक प्रेमप्रकरण जे डोळ्यांसमोर गाजल .. मैथिली..
आणि last but amazing  नेहा'स  unexpected entry in this..
त्रास नेमका कशाचा होतोय हेच काळात नाहीये..
हे कधी न कधी होणारच होत ...
नेहमीच का सगळे तुझ्या एका  call  वर भेटायला येणारेत ?
 weekendla  कुठला धम्माल  plan  होणारे? 
आग इतकाच  काय  calls  पण कमी होतील.  
आताच इतकी  दूर आहेस कि एकाच्याही लग्नाला नाही जाऊ शकणार ..
मला तर भीती वाटतेय कि मी सायुच पण लग्न  miss  करणारे,,
तुझ्या लग्नाला कुणी येईल अशी मात्र अपेक्षा करू नकोस..
माणस बदलतात , परिस्तिथी बदलते.. 
मग मी तशीच का आहे.. 
मला असाच सगळ्या सोबत जपून ठेवायचं .."pouru  कधी सुधारणार तू ?"" अस खोट्या रागाने विचारणाऱ्या.
माझा प्रत्येक stupid प्लान  successful  करणाऱ्या ....
माझ्या अवाजावरून ओळखणाऱ्या कि  madam चा मूड आज काही ठीक नाही ..हजार गोष्टी करून मला  cheerup  करणार ..
आताही तू इथे असतीस तर.. काय केल असत अस  imagine  करत राहणाऱ्या..
they r gonna miss me for sure...and i like that feeling.)

उद्या कदाचित मीच बदलेन ..पण एक गोष्ट माझी नाही बदलणार ती असेल ..त्या आठवणीना तसाच ठेवायचा प्रत्येक प्रयत्न ...




पौर्णिमा ...
















  


Saturday, September 15, 2012

स्वप्नाच्या पल्ल्याड असलेल एक ठिकाण


अमेरिका..
एक स्वप्न , हजारो अपेक्षा , कैक विरोध आणि त्यसगळ्यासाठी पाठीशी उभी ती माझी आई..
आज हजारो मैल लांब आले खरी.. पण त्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न आठवला की शहरा येतो.. अखेर सार्थ झलाच.
कितीदा लिहाव म्हटल ..प्रत्येकाला सांगाव म्हटल अमेरिका खूप भारी आहे. पण इंडिया आठवता सरशी मला त्याची किंमत राहत नाही.
आई नेहमी विचारत असते.. काय वेगळ असत तिकडे..आणि या प्रश्नच उत्तर एवढाच की इथे तुम्ही लोक नाही आहात ..बाकी मला फरक पडत नाही पुणे असो वा  San Jose.
आज महिन्याभरा नंतर  इथे येण्याची तीव्रता जाणवतेय.. इथे येऊन जम बसविण्याच्या भानगडीत डोक्याला आरामच मिळाला नाही ..
आज शांत झले तेंव्हा कुठे कळल की किती गोष्टी सोडून आलेय  मी ..
घर, आई ,ताई, फॅमिली, शेवटच बोलतही न आलेले आणि मी जाणार म्हणून अक्षरशः रडलेले माझी दोस्त मंडळी..नांदेड, पुणे, जॉब, सॅलरी,atmsophere , जेवणाचे पदार्थ, संस्कृती, नाती, आपुलकी ओळखीचे चेहरे..माती..तिचा मृद्गंध.. देऊळ आणि देवळाच्या अंगणातला जुईचा सडा.activa, पाणीपुरी, ..BSNL च गंडलेल नेटवर्क,..PMT मधली धक्काबुक्की..आणि हो दर Friday new released muv.
नाही म्हटला तरी आद्रक घालून गॅस वर केलेल्या चहाची सर microwave मधलेल्या चालला येताच नाही..
comferter ला  गोधाडीची उऊब येत नाही..
घरच्या साध वरण भाताची चव quesdilla ला कुठे?
गल्ल्या खूप आहेत पण गल्ली क्रिकेट कुणी खेळत नाही..
माणस खूप पण आत्मियातच वाटत नाही..
दिवसभरच्या एक ना ए कशा हजारो गोष्टी सांभाळता सांभाळता इथे वेळ कसा जातो कळतच नाही…
इथे आलेला प्रत्येक व्यक्ती एक धेय घेऊन जागतोय..मीही त्यातली एक.. तळ्यातला थेंब ..
अजूनही भावनानाच जास्त महत्व देणारी..
खरच पैसा इतका का महत्वाचा असतो.. किंवा दुसर्‍यच्या पुढे जाणे?
याची उत्तर मला न भेटलेलीच बरी ..
मला इथे असं आनंद लुटायचं .. ज्या गोष्टीसाठी माझया घरच्याना मझा अभिमान वाटतो मला ते करायचं
आणि हो जी सगळ्यानाच भीती आहे मझयाबद्दल.. “मी वाया जाऊ  नये” याचाही प्रयत्न करेन..
चला अजुन एक रात्र ओसरली …
उद्या जाईन पुन्हा इंडिया बज़ार मधे तेच मसाले आणि भाज्या घायला..
substitute of indian market as they say :-)
वरच सगळ विसारा ..इथे पाहिजे ते मिळत फक्त $ मोजावे लागतात बस…इतकच..
i wont say life is here.. but one should definitely come here to realize what they will be missing ...
आज के लिये इतनाही ग्यान......
शुभ रात्री..




Saturday, July 7, 2012

अस कधी झालंय का?

रस्त्यावर चालता चालता सहज ध्यानी मनी नसताना तुम्हाला ओळखीची व्यक्ती दिसते ..mostly तुमचेfriends..
तुम्ही आनंदित होता , 2 क्षण थांबता आणि त्या व्यक्तीला ओळख द्यायचा प्रयत्न करता ...कधी smileकरून , कधी नुसत हात wave करून किंवा अगदिच जवळीक असेल तर जावून गळ्यात सुद्धा पड़ता..
just to realize that जिला तुम्ही friend समजुन अश्या गोष्टी केल्या  
ती व्यक्ति भलतीच कुणीतरी निघते .....
तुमच्या डोळ्यांसमोर चांदणे तरलतात ... ती व्यक्तीही तुमच्याकडे आभाळ 
कोसळल्यागत बघत राहते. ..
(एक वेळा आपण हिला ओळखतो का असाही तिचा विचार करून झाला असावा )
तुम्ही embarrase होता..
तिथून कसेबसे sry sry म्हणून सटकता ..
मागच्या  min मध्ये काय झाल याचा विचार करता ..आणि तुम्हाला हसू फुटत..काय हा वेडेपणा...
मग ज्या व्यक्तीची तुम्ही गल्लत केली तिला sms करून सगळा प्रसंग सांगता ...
ती व्यक्तीही तुम्हाला वेड्यात काढते...
आणि हसता हसता ती गोष्ट आठवणींत जमा करता ...

जेंव्हा पुढच्यावेळी असाच कुणी रस्त्यावर दिसेल ना तो प्रसंग डोळ्यांसमोर येतो..तुम्ही स्वताला सावध करता...
नक्की खात्री करून घेता कि ती व्यक्ती ओळखीचीच आहे...
पुन्हा एक वेडेपणा टाळण्यासाठी.


Description: Description: cid:image014.gif@01CC9FA8.B28D7980
pournima

Monday, June 25, 2012

5:30 a.m. @ pune


शेवटच्या वेळी मी सकाळचे 5:30 कधी पहिले होते ते आठवत नाही.
झोपेच्या बाबतीत मी एक आळशी कांदा आहे हे आत्तापर्यंत सगळ्यानाच कळून चुकल आहे ,माझ्या roommates  नि तर मला उठवायचा नाद केंव्हाच सोडलाय.
आता तर बिनधास्त खोट बोलतात की "आम्ही तुला उठवल होत पण तू झोपेत होतीस ना म्हणून तुला आठवत नसेल"
असो.. सांगायचा मुद्दा असा की  मी बर्याच दिवसांत ..rather बर्याच वर्षांत सकाळचे 5:30 पहिले नव्हते...आज सकाळ पर्यंत.

"औरंगाबाद वरुन येणार्या बसस ना पण इतक्या लावकर का सोडायच असत खर." मी मनाशीच म्हटल..
त्रागा करून काही फायदा नव्हता कारण तो कंडक्टर 3 वेळा मोठ्याने ओरडून गेला "शिवाजी नगर लाष्ट ष्टोप "
कानात घंटानीनाद व्हावा तास्साच...चर्फडाले पण उठावाच लगाल..
झोपचे डोळे कील्किले करून उघडायचा प्रयत्न करत बस पाससागे माधून मी दारापाशी येत होते ..
तेंव्हाच माझे डोळे खडकन उघडले "आता घरापर्यंत ऑटो करावा लागणार" या विचाराने आणि अक्षरशः शहारा आला...
(आता तो त्या बाहेर पडलेल्या थंडीमुळे होता कि या ऑटो वाल्याशी घालाव्या लागणार्या हुज्जती मुळे ते देवच जाणे.)

बाहेर प्रसन्न वातावरण होत..  हलकस उजाडलेल आणि नुकताच पाउस पडून गेलेला.. हे आसपासच्या झाडांवरच्या थेंबावरून, आणि पावसामुळे काळवंडलेल्या डांबरी रस्त्यावरून मला
कळून चुकल. वातावरणाचा आनंद घेत होते तोच .. 3-४ ऑटो वाल्यांनी गराडा घातला "बोला मॅडम कुठे जायच? अहो बोला की.. चला इकडे कर्वे नगर ना.."
मला एक काळात नाही 2-3 मुली दिसल्या की नक्की हे लोक कर्वे नगरलाच जायच अस का विचारत राहतात..
दुसरी कडे रहताच नाहीत का? हे न उलगडणार कोड आहे.माझ हव ते डेस्टिनेशन सांगितल्यावर त्यातल्या 1-2 जणांनी तोंड वेडवाकड करून पाठ वळवली...
आणि बाकीचे मग अव्वाच्या  सव्वा किंमत सांगू लागले...
"अहो काका ऑटो विकत नाही घ्यायचाय आम्हाला..." अशसारखे अनेक dialogues  मारुन आणि भन्नाट घासघिस करून हव्या त्या किमतीत मी त्याना तयार केल ..(मागच्या 6 वर्षांमधे हुज्जत घालण आणि convince कारण चांगल शिकलेय ;-))

घरी लवकर पोचायची घाई झालेली कारण अर्धवट झोप मला डीवचत होती.
पण जसा ऑटो सुरू झला तास रस्त्यावर चाललेली हालचाल पाहण्यात मी दंग झाले.
सकाळच्या त्या वेळी मला बर्याच ठिकाणी, काही दुकानाच्या आडोशयाला पापर चे गठ्ठे घेऊन बसलेले लोक दिसले, छोट्या छोट्या गठ्यात त्याच वर्गीकरण सुरू होत आणि मग अजुन 1-2 लोक येऊन ते गठ्ठे साइकल, नाही तर scooter वगरे वर लादत होते..
एवढ्या थंडीच हे लोक रोज उठून हे काम करतात आणि आपण आरामात उठून मस्त चहा बनवेपर्यंत त्यानी पेपर पोचवलेला पण असतो..
पावसाळ्यात दारावर पडलेला ओला पेपर आठवला  आणि आत्ता त्या लोकांची पेपर पाण्यापासून भिजण्यापासून वाचवण्याची धडपडही पहिली ..
शांत झाले मी ..नवीन अशा बर्याच गोष्टी अचानकच जाणवल्या..

मी अजुन काही दिसतय का ते शोधू लागले..
IT Company तले लोक गळ्यात पट्टे घालून बस ची वाट बघत होते..
कुत्र्यांच्यावर अवस्था हो.
काय ते बिचारे 5:30 वजताही कामावर जातात.. दया आली मला त्यांची..
करणार काय .. "सदा सर्वदा योग पैश्यांचा घडवा " हे ब्रीदवाक्य घेऊन जगणारे ते लोक...

असो..
मधेच माझ लक्ष मीटर कडे गेल..
middle class म्हटल की ऑटो मधे बसल्यापासून दर 100 meter ला झालेली "कट"  heartbeats वाढवते   ..
पण फारस काही अवाजवी अस न झल्याने मी परत रस्त्याकडे डोळे वळवले..
सगळ शांत होत.. फारसा कलकलाट नाही..
बंदिस्त दुकाने आणि रिकामे रस्ते वेगळेच वाटले,,त्याना तस पाहायची सवयच नाही राहिली ना ..
त्या दुकानंमागे आता आकाश लाल व्हायला लागल..म्हणजे आता  लवकरच उजाडणार  होत..
PMT सुरू झल्या.. भाज्यांच्या टोपल्या, दुधाचे क्रेट्स  रस्त्यांवर ठिकठीकाणी दिसत होते..
भाजीवाले आता त्या भाज्या मांडायला लागले होते..
सकाळी ताजी भाजी घेण्यासाठी लवकरच लोकांची गर्दी होईल म्हणून कदाचित तो खूप  चटचट आवारात होता..
आपण कधी अशी ताजी भाजी आणायला उठलो होतो का या विचारावर मला हासुच आल ..

शेवटी घर जवळ आल तस हायस वाटल...
ढगांमुळे अजूनही सुर्य वर नव्हता आला पण त्याच अस्तित्व त्याच्या दूरवर उधळल्या गेलेल्या किरणानी जाणवल..औटोचे पैसे देत मी एका हाताने घरची चावी शोधत होते.मला तितकासा वेळही वाया घालवाव वाटेना..घरी आले fresh झाले .. झोपणार इतक्यात नजर खिडकीबाहेर गेली..
वाटल अनायसे उठलोच आहोत तर आज वेगळ काहीतरी कराव ..
जाउन दूध आणाव , चहा करावा ..दारात पेपर पडेल त्याची घडी सकाळी सकाळीच उघडवी.. आणि चहाच्या एकेक घोटाबरोबर एकेक बातमी चघळावी..
galary येऊन जरा सुर्यनमस्कार घालावेत ..
आज डबा बनवून घेऊन जावा office मध्ये  त्यासाठी खालून ताजी भाजी आणूया ...
असे अनेक plans माझया मनात चालेले आणि एक थंड हवेची झूळुक शिवून गेली ..
मग काय बाजूला पडलेल लुसलुशीत रजई दिसली आणि..
अजूनही उबदार असलेली गाडी दिसली..
नवीन काहीतरी कराव का त्या उबदार गादीमध्ये सुखधीन व्हाव याचा द्वंद  मनात असतानाच मला अलगद झोप लागली..
आणि डोळे उघडले तेंव्हा 9 वाजून गेलेले.....
आत्ता कळल माझया roommates मला अस का करतात ते?

Friday, June 15, 2012

Unspoken...


You know I never could tell anyone about him.
While my friends could not stop chattering about their special ones, I used to keep a mum n simply smile.
I hated that feeling.  All my thoughts used to choke near my throat and would vaporize before I could add voice to them.
So many memories of him, So many feelings, I would go on day and night.
They seemed very happy when “special ones” used to visit.  It would nearly kill me.
I had to suppress those feelings that too with a smile. And no one ever understood.
I would write letters to him and tell all the things which I couldn’t share.
Even he felt bad at times. “Why is it so important for you tell them. Isn’t it sufficient that i am always with you to listen what you have to say”
“No. you don’t understand. It hurts when I can’t tell the stories of you which are far better than theirs. You know even I tried once. They won’t listen they would just change the topic. I hate them”
I would cry whole night in his arms. He would keep consoling me that it is not even worth to cry for.
He was invisible for others but always there for me.
He taught me to take decision on my own and standing by for the consequences.
He taught me to seek the dreams I would have never thought of.
He taught me to love and help everyone even though they stab you back.
He taught me to keep smiling though the pain is burning you from inside.
He suffered a lot in his life. Still an optimist.
I never understood where he could possibly bring such a positive attitude?
Eventually I learnt living without mentioning him. He, as invisible as one can be, stayed away from me to make me tougher. It did work.
No more crying. No more pain. I am happy now. Fulfilling the dreams only he had hoped that I would achieve.
And you know what now I can proudly tell to everyone around Him… about the only person who was there for me when everyone turned their backs. He never doubted me.
The only person on the earth I love so much that I would do anything he asks.
Yes.. He is my everything. He is ……


















 My Father….
“Happy father’s day Baba!!!”









 pournima

Wednesday, June 13, 2012

A wise thing to do...





कधी कधी आयुष्यात जवळच्या व्यक्तीलाही दूर करव लागत.
कारण
 त्यांच्या दूर जाण्यापेक्षा त्यांच तुमच्यासोबत असं हे अधिक त्रासदायक ठरत.
काही
 नात्यांमधे आपण इतके जवळ येऊन जातो की एकमेकांबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टीही माहीत होऊन जातातआणि मग ह्याच गोष्टी एकमेकांविरूद्ध वापरल्या जातात.एकत्र राहायचा तर असत कारण त्या व्यक्तीचा सहवासतुम्हाला हवा असतो पण त्या नात्यातून आलेली बांधिलकी सहन नाही होत.
आधी
 आपणच त्याना सगळे हक्क देऊन ठेवतो आणि मग एके दिवशी "personal space" ची जाणीव होतेआणि आजतगायत दिलेले सगळे हक्क एकदूम काढून घेतले जातात. तेंव्हा उत्पन्न होते ती नात्यमढलीअसुरक्षितता.
बोलून
 तुम्ही दाखवू शकता नाहीत.भंडून काही solutions मिळत नाहीत.

एकाला
 खूप दूर पाळायच असत कारण त्याला नात्याचं ओझ व्हायला लागत.
आणि
 दुसर्याला एवढ्या छान आठवणी आणि बंध इतक्य सहजासहजी तुटू द्यायचे नसतात.
वाढतो
 तो फक्त ताण, अस्वस्थता आणि चिडचिड.
पण
 एक क्षण असा येतो जेंव्हा बांधून ठेवलेल्याला तुम्हाला सोडवच लागत.
दोघांच्याही
 भल्यासाठी.

दिवस
 जातात, जखमहि भारतात, तुम्हीही सावरता. शांत होता
नव्याने
 एक आयुष्य उभारता , त्या व्यक्तीची पोकळी जवते पण ती परोपरीने भरून काढायचा 
प्रयत्नही
 करता.
आणि
 अचानक जेंव्हा सगळ काही सुरळीत असत तेंव्हा बंध तोडून गेलेल्या व्यक्तीला उपरती होते. आपण आपल्याअट्टहासपाई काय गमावलाय याचीही त्यास जाणीव होते.
तो
 पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ पाहतो.
हळूच
 डोकावतो माफी मागतो , जुन्या आठवनीचा आसरा घेतो ..
एक
 मार्मिक क्षण ज्यामधे तुम्हाला वाटत की त्यला माफ करून सगळ सुरळीत करव.
पण
 तुम्ही स्वतःलाच अडवता.
खंबीर
 राहून निर्णय घायचा. आज ही व्यक्ती वापस आली , माफी मागतेय पण खरच त्याला पश्चात्ताप झालायम्हणून तो वापस आला आहे की दुसर कुणी त्याला भेटल नाही म्हणून?
आणि
 जरी हे विसरून मे सगळ मान्य केल तरी हे पुन्हा घडणार नाही याची काय खात्री?
शांत
 राहून तुम्ही तुमचा दबलेला राग वाहू देता. आणि पुन्हा एकदा ते नात विखरत.

दिवस
 लोटतात पण तुम्ही हे सगळ विसरू नाही शकत. वादळ एकदाच पेलावत .कितीही ताठ राहील ना तरी मुळांनाधक्का हा पोहोंचानाराच. 
मग
 तुम्हीही ठरवता. त्या व्यक्तीला एकदा भेटायाच ..शेवटच.
मनात
 जे काही असेल ते बोलायच. तो तुमच्या आयुष्याशी विभक्त होऊ शकत नाही कारण त्याने दिलेल्या जखमाअजूनही तुम्ही बाळगत आहात.ते सोडायला पाहिजे. त्या व्यक्तीला माफ करायच. माफी दिली की रागची करणेहीविरतात. मन हलक होईन जाईल. आणि एक दरवाजा कायमचा बंद करता येईल...
हो
 पण त्यासाठी आधी भेटल पाहिजे खर ...:-)

बघ तुला तरी  तू ओळखू येतेस का office मधून सरळ घरी ये सोफ्यावर न बसता आत जा अडगळीत टाकलेल्या vip ची बॅग काढ त्याच्या तळाला गेलीली  dai...