कुठे हरवलाय तो ओलावा ..
ती ओढ ..ती काळजी ..आपलेपणा ,
एकमेकांसोबत कितीही भांडलो तरी बाहेरच्या जगाला एक म्हणून सामोर जायचं
मस्ती आणि दंगा याहीपलीकडे जाऊन होणार हितगुज .
डोक्यावरच्या ओझ्याचं पोत रिकाम कराव आणि हलक्या मनाने पिसागत उडाव ..
२४ सोबतही जेंव्हा कमी वाटायची ..सकाळ एकमेकांना आणि रात्रही एकमेकांची उडवत व्हयाची.
बाहेर च्या जगात सिंहाची मांजर व्हावी ..
टपल्या काय लाथा काय ...गुदगल्या काय किंवा गालगुच्चे काय सगळाच बालिश ..
चिडण चिडवण हा तर रोजचाच उद्योग ..
कुणी हिरमुसल कि एक smile ..कुणी रडल कि एक hug ..किती समाधान वाटायचं.
छोट्या छोट्या गोष्टींच celebration ..
किती गुरफटलो न एकमेकांत कि बाहेरच जग क्षुल्लक वाटाव ..
पण सगळाच बदलल..
भेट नाही साध बोलणही नाही ,, त्या विश्वात दुसर्यांना जागाच नाही ..
एकमेकांच्या इतक्या spacial moments साठी कुणाला वेळ नाही , कदाचित तो काढायची इच्छा पण..
"तुम्ही अस करणार




?"
आता पुन्हा तशी मैत्री नाही मिळणार मला..
मनात येईल ते बोलेन पण वाईट न वाटून घेणारे लोकच नाही..
मनसोक्त रडायला इथे कुणाचा खांदाच मिळत नाही..
मनापासून कौतुक करणार , नाही आवडलं तर तोंडावर सांगणाराही कुणी नाही..
सगळाच वरवरच ...हताश होते मी कधी कधी ..
पण लक्षात येत त्यांच्याही आयुष्यात कुणी तुम्च्यासारख असणारच न ..
ते लोकही तो ओलावा टिकवायचा प्रयत्न करत असणार ...
पुण्यात येण्याच्या निर्णयाने मला जे दिलय मला ते आयुष्यभर तसाच ठेवायचं....
मला थोडीशी मदत कराल?
pournima
No comments:
Post a Comment