आपण कितीही मोठे झालो
ना तरी एक द्वाड पण निरागस मन आपल्याला लहानच बनवून ठेवतं.
अजूनही आकाशातून जेव्हा विमानाचा आवाज येतो ना ... 'मन' टाळ्या वाजवत उड्या मारायला लागतं आणि आपण त्याचा बालिशपणा पाहून हसतो.
अजूनही झोपतांना
'तो'
खट्याळ आईच्या कुशीत जाऊन शिरतो आणि अंगाईगीतावर
झोपून जातो. आपण मात्र डोळे मिटून
त्याचा हेवा करत राहतो.
अजूनही
जेव्हा उन्हाळ्यात कुल्फीची घंटी वाजते ना ... मन चिल्लर जमा करून अनवाणी पायाने पळत रस्त्यावर जातो आणि आपण त्याच्या
पाळण्याकडे कान टवकारतो.
अजूनही
५ वाजले ना की आपण कामात मग्न असतो , 'तो'
मात्र धूम ठोकतो..गोटया, लंगोरचा, लपंडाव
खेळतो, चीडीचे डाव जिंकतो.झाडावर चढून चिंचा तोडून खातो, फुलपाखरांमागे धावतो.
आजही जेव्हा पाऊस पडतो , आपण खिडकीतून तो बघत बसतो. 'तो' कधीचाच
त्या पावसात भिजायला गेलेला असतो, कागदी
होड्या बनवतो, मित्रांबरोबर शर्यती
लावतो, चिखलात लोळतो.
आजही जेव्हा कुणाचा मना पासूनरागयेतो,
आपणस्वतःलाशांतकरायचा प्रयत्न करत असतो
आणि मन केव्हाच त्याला बोचकारून आलेला असतो.
मी कामात असेल आणि त्याच्याकडे लक्ष नाही दिलं ना की 'तो'
रुसतो, हिरमुसतो, म्हणतो" तूमोठीकाझालीस?
नको अशी मला तू. तू परत लहान हो ना एकदा plzzz" आणि त्याच्या त्या निरागस चेहेरयाकडे फोलपणे
बघत मी त्याला म्हणते " आता
मी तिथे कधीच नाही परतू शकत... कधीच
नाही".
पौर्णिमा
No comments:
Post a Comment